नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या महाराष्ट्रातील पण आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता महाराष्ट्र सरकारने Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana सुरू केली आहे या योजनेअंतर्गत इतर मागासवर्गीय वर्ग जसे की, (OBC), विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT) आणि विशेष मागास प्रवर्गातील (SBC) विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीने स्कॉलरशिप दिली जाणार आहे.
तसेच या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारकडून या विद्यार्थ्यांना शिक्षण आणि वस्तीगृहाचा खर्च भागवण्याकरिता आर्थिक मदत केली जाते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेचा मुख्य उद्देश हा विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनवणे तसेच गरजू करीत विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणी शिवाय त्यांचे शिक्षण पूर्ण करण्या साठी प्रोत्साहन देणे हा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला देखील या शिष्यवृत्तीचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना काय आहे
ज्ञानाची सावित्रीबाई फुले ही योजना महाराष्ट्र मधील इतर मागासवर्गीय म्हणजेच (OBC), विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT), आणि विशेष मागास प्रवर्गातील (SBC) विद्यार्थ्यांकरिता एक महत्त्वाची योजना मांडली जाते तसेच या योजनेचा मुख्य उद्देश हा आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांचे उच्च शिक्षण पूर्ण करण्याकरिता आर्थिक मदत देणे असा आहे.
तसेच या योजनेअंतर्गत गव्हर्मेंट किंवा प्रायव्हेट वस्तीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण तसेच निवास आणि भोजनाच्या खर्चासाठी सरकारमार्फत थेट मदत केली जाते आता जे विद्यार्थी शहरी भागात म्हणजेच महानगरपालिका क्षेत्रात शिक्षण घेतात अशा विद्यार्थ्यांना वार्षिक 60,000 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळते तसेच इतर भागातील विद्यार्थ्यांना वार्षिक 50,000 हजार पर्यंतची आर्थिक मदत केली जाते आणि ही मदत थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते यामुळे ही योजना गुणवंत विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनवते आणि त्यांना त्यांच्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी एक मोठा आधार देते
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेची उद्दिष्ट्ये
- या योजनेचा मुख्य उद्देश हा इतर मागासवर्गीय म्हणजेच (OBC), विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT) आणि विशेष मागास प्रवर्गातील (SBC) गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे असा आहे.
- गुणवंत विद्यार्थी आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी समान संधी निर्माण केल्या जातात आणि त्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प प्रोत्साहित केले जाते.
- शासकीय हॉस्टेलमध्ये लिमिटेड जागा असतात त्यामुळे अनेक मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही. पण अशा विद्यार्थ्यांना प्रायव्हेट हॉस्टेलमध्ये किंवा रूम भाड्याने घेऊन जावे लागते. अशा विद्यार्थ्यांना सरकारमार्फत वस्तीगृहाचा पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे शकेल.
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही योजना विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देऊन त्यांच्या शिक्षणावरील ताण कमी करते यामुळे विद्यार्थी कोणत्याही आर्थिक अडचणी शिवाय त्यांचे शिक्षण अगदी सहजरित्या पूर्ण करू शकतात आणि त्यांचे भविष्य उज्वल तसेच सुरक्षित करू शकतात.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचे पात्रता निकष
- अर्जदार विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार विद्यार्थी हितच मागासवर्गीय म्हणजेच (OBC), विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT), किंवा विशेष मागास प्रवर्गातील (SBC) असावा.
- अर्जदार विद्यार्थ्याकडे अधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- अर्जदार विद्यार्थी उच्च शिक्षण घेत असावा म्हणजेच तो अभियांत्रिकी वैद्यकीय कृषी कला विज्ञान किंवा वाणिज्य किंवा अशा इतर कोणत्याही मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेत असावा.
- अर्जदार विद्यार्थ्यांनी कोणत्याही शासकीय किंवा गैरशासकीय वस्तीगृहांमध्ये प्रवेश घेतलेला नसावा.
- अर्जदार विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.50 लाख पेक्षा जास्त नसावे.
- अर्जदार विद्यार्थ्याकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार विद्यार्थ्यांचे बँक खाते हे त्याच्या आधार कार्डाची लिंक केलेले असावे कारण या योजनेची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचे मिळणारे आर्थिक लाभ
खर्चाचा प्रकार | महानगरपालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी | महानगरपालिका वगळता इतर क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी |
निवास (राहण्याचा खर्च) | ₹2,400/- प्रति महिना | ₹1500/- प्रति महिना |
भोजन (जेवणाचा खर्च) | ₹2000/- प्रति महिना | ₹1200/- प्रति महिना |
निर्वाह भत्ता (इतर खर्च) | ₹1200/- प्रति महिना | ₹600/- प्रति महिना |
वार्षिक मदत | ₹60,000/- | ₹50,000/- |
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेची अर्ज करण्याची सविस्तर प्रक्रिया
- या योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम महाडीबीटी पोर्टल वर रजिस्ट्रेशन करा
- रजिस्ट्रेशन करण्यासाठी महाडीबीटी पोर्टलच्या https://mahadbt.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- वेबसाईट वरती तुम्हाला New Applicant Registration हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
- आता आधार कार्ड क्रमांक व मोबाईल नंबर टाकून तुमचे नवीन प्रोफाइल तयार करा.
- आता तुमच्या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी येईल तो येथे व्यवस्थितरित्या भरा आणि नोंदणी पूर्ण करा.
- नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर तुमच्या युजरनेम आणि पासवर्ड ने पोर्टल वरती लोगिन करा.
- आता कम्प्लीट प्रोफाइल या पर्यायावर ती क्लिक करा आणि तुमची वैयक्तिक माहिती भरा यामध्ये तुम्हाला तुमचे नाव पत्ता जात कौटुंबिक उत्पन्न तसेच बँक खात्याची माहिती भरावी लागेल.
- महत्त्वाचे म्हणजे बँक खात्याची माहिती भरताना खाते क्रमांक आधार कार्डशी लिंक असावा. कारण योजनेची आर्थिक मदत थेट बँक खात्यामध्ये जमा होत असते.
- आता प्रोफाइल पूर्ण झाल्यानंतर ‘Schemes’ मेन्यू मध्ये जा त्यानंतर Social Justice and Special Assistance Department हा पर्याय निवडा.
- या पर्यायांमध्ये तुम्हाला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना दिसेल ती निवडा.
- आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे योजनेचा अर्ज तुमच्यासमोर उघडेल अर्जामध्ये विचारलेली माहिती योग्यरीत्या भरा.
- अर्ज मध्ये तुम्हाला तुमच्या महाविद्यालयाचे नाव अभ्यासक्रम तसेच इतर शैक्षणिक माहिती भरायची आहे तसेच अर्ज भरत असताना अर्जामध्ये विचारली जाणारी आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. महत्त्वाचे म्हणजे ही कागदपत्रे तुम्हाला स्कॅन करून ठेवावी लागतील.
- सर्व माहिती आणि कागदपत्रे व्यवस्थित अपलोड झाल्यावर एकदा भरलेला अर्ज व्यवस्थित रित्या तपासा त्यानंतर सबमिट पर्यायावर ती क्लिक करून अर्ज सादर करा.
- अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला एक अर्जाचा क्रमांक मिळेल तो तुमच्याकडे नोंदवून ठेवा या क्रमांकाचा वापर करून तुम्ही अर्जाची स्थिती तपासू शकता.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- जातीचा दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- बँक पासबुक
- बोनाफाईड प्रमाणपत्र (तुमच्या कॉलेजकडून मिळते)
- मागील वर्षाच्या परीक्षेची गुणपत्रक
- रहिवासी पुरावा (Domicile Certificate)
- शाळा सोडल्याचा दाखला (TC)
Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana Last Date 2025
विद्यार्थी मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की सर्वात अचूक आणि अधिकृत माहिती जर तुम्हाला मिळवायची असेल तर तुम्ही महाडीबी पोर्टलवर किंवा महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन तपासा. कारण अशा योजनांची अर्जाची मुदत अनेकदा वाढवली जाते म्हणूनच तुम्ही अधिकृत वेबसाईट वरती भेट देऊन वारंवार माहिती तपासायला हवी
महत्त्वाचे संपर्क आणि हेल्पलाइन
संपर्काचा प्रकार | माहिती |
अधिकृत वेबसाइट | महाडीबीटी पोर्टल |
हेल्पलाइन नंबर | 022-49150800 |
ईमेल आयडी | info.mahait@mahait.org |
मुख्यमंत्री हेल्पलाइन | 1800 120 8040 (टोल फ्री) |
या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा?
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा अर्ज फक्त महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने स्वीकारल्या जातो.
अर्जाची स्थिती (Status) कशी तपासायची?
अर्जाची स्थिती तपासण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा आणि एप्लीकेशन स्टेटस पर्यायावर क्लिक करून अर्जाची स्थिती तपासा.
सारांश
विद्यार्थी मित्रांनो ही योजना केवळ आर्थिक मदतीसाठी नाही तर विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी देखील आहे विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणी शिवाय त्यांचे शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी ही योजना प्रोत्साहित करते तसेच योग्य पात्रता निकष आणि ऑनलाइन प्रक्रियेमुळे गरजू गरीब विद्यार्थी या योजनेचा अगदी सोप्या पद्धतीने लाभ घेऊ शकतो यामुळे महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी आपल्या शैक्षणिक आणि व्यावसायिक जीवनाची सुरुवात अगदी सहज पद्धतीने करू शकतील म्हणून ही महत्त्वाची माहिती तुमच्या गरजू गरीब आणि गुणवंत मित्रांना नक्की शेअर करा